आवळगाव
दिनांक १६/०४/२२ रोज शनिवारला सायंकाळी अंदाजे चार ते पाच वाजे दरम्यान श्री तुळशीराम सुकरु कांबळी वय अंदाजे ६७ वर्ष हे नित्यनियमाप्रमाणे आपल्या शेतामध्ये उन्हाळी धान व मिरच्या यांना पाणी देण्याकरता शेतावरती गेलेअसता त्यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने ते खाली वाकले असता त्याच्यावर झडप घातली आणि जागीच ठार केले.
ठार करून झाल्यानंतर त्याला मिरचीच्या शेतातून जवळपास 200 ते 300 मीटर ओढत वैन- गंगा नदी किनारी घनदाट गवतात नेऊन ठेवले.
सदर मृतक व्यक्ती हा आपल्या मुलीची तेलीमेंढा या गावावरुन भेट घेऊन स्व – गावी आला आणि लगेच शेतावर निघून गेला आणि वाघाचा बळी ठरला.
मृतक व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी येथे रात्रो हलविण्यात आला.
या वेळी घटनास्थळी ब्रह्मपुरी चे ठाणेदार आपल्या ताफ्यासह उपस्थित होते.
मृतक व्यक्ती हा वाघाशी दोन हात करणारा आणि प्रसंगी त्याला पिटाळून लावणारा शेवटी तोच वाघाचा बळी ठरला.
सदर मृतक व्यक्तीवर हल्ला करण्याअगोदर त्या वाघाने होमराज सातपुते यांच्या शेळीवर हल्ला करून जखमी केले होते.
सकाळपासूनच बोधना घाटावरच्या रस्त्यावर वाघ ठाण मांडून बसलेला होता असे ह्या रस्त्यावरून जाणारे येणारे शेतकरी सांगत होते.
मृतक व्यक्तीला दोन मुले आणि एक मुलगी असून बराच मोठा आप्तपरिवार आहे.
मृतकुटुंबीयांच्या परिवाराला तात्पुरती आर्थिक मदत उपविभागीय वनाधिकारी, ब्रह्मपुरी श्री महेश चोपडे, आवळगाव चे वनक्षेत्र सहाय्यक श्री ए. पी. करंडे, वनरक्षक श्री एल. डी. सातपुते यांनी वीस हजार रुपये दिले.
जंगलाला लागलेल्या वणव्यामुळे जंगली पशु नदीकिनारी वास्तव्यास आहेत.
यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी रास्त मागणी या परिसरातील जनता वनविभागाला करीत आहे.
वाघाच्या हल्ल्यात इसम ठार


Add Comment